कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो. तुळशीला विष्णू-प्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे. परंतु, काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात व पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच श्रीकृष्णाशी लावला जातो.
ND
ND
तुळशी विवाह कसा करावा? * तुळशी विवाहाच्या तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी. * मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा. * चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा. * यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा. * यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे. * गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे. * मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे. * यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी. * नंतर वस्त्र व आभूषणे घालावित. * नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे. * शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा.
ND
ND
तुळशीचे महत्त्व * तुळशी हे दिसायला साधारण रोप असले तरी भारतीयांसाठी ते पवित्र आहे. * पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे असते. त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते. * नवमी, दशमीचे व्रत व पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणाला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. * स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पानी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. * तुळशीमुळे तिच्या आसपासच्या वातावरणातील हवा शुध्द होते. * तुळशीपत्रांचा अर्क बर्याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो.