शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

मृत्यूच्या 6 महिने अगोदर हे 7 काम करू शकत नाही लोक

कठोपनिषद आणि गरूड पुराणापासून शिव पुराणापर्यंत सर्वांमध्ये सांगण्यात आले आहे की जो पृथ्वीवर येतो त्याला एक दिवस हे शरीर सोडून जावे लागते कारण ही पृथ्वी मृत्यू लोक आहे अर्थात येथे मृत्यूचा साम्राज्य आहे. पण मृत्यूसाठी प्रत्येक व्यक्तीची वेळ निर्धारित आहे आणि त्याच वेळेस त्याला जायचे असते. अकाल मृत्यू हा ईश्वराचा दंड असतो ज्यात व्यक्तीचे शरीर सुटून जात पण त्याच्या आत्मेला परलोकात प्रवेश करण्याची परवानगी नसते आणि जोपर्यंत त्याची वास्तविक मृत्यूची वेळ येत नाही तो बीनं शरीराचा भटकत असतो.  
 
आपल्या नाकाचा पुढचा भाग बघू शकत नसाल तर हे संकेत आहे की मृत्यू हळू हळू तुमच्या जवळ येत आहे.  
 
तुमची सावली तुम्हाला दिसत नसेल तर मृत्य जवळ येण्याचे संकेत आहे.  
 
सर्व काही ठीक असले तरी आरशात आपला चेहरा स्पष्ट दिसत नसेल किंवा आरशात स्वत:ला बघून ओळखू शकत नसाल.  
 
शिव पुराणात सांगण्यात आले आहे की मृत्यूच्या 6 महिने अगोदर व्यक्तीची जीभ योग्य प्रकारे काम करणे बंद करून देते. व्यक्तीला भोजनाचा स्वाद घेता येत नाही आणि बोलण्यात देखील त्रास होऊ लागतो.  
 
जीभ शिवाय तोंड, कान, डोळे देखील योग्य प्रकारे काम करणे बंद करून देतात. शरीराच्या या ज्ञानेंद्र्या एकसाथ काम करणे बंद करून देतात तर हे मृत्यू जवळ येण्याचे संकेत आहे.  
 
आकाशात जेव्हा तारे दिसत नसतील तर हे संकेत आहे की जीवनातील काहीच महिने बाकी उरले आहे.  
 
मृत्यु जवळ आल्याने व्यक्तीला चंद्र सूर्य सामान्य दिसत नाही व यांच्या भोवती काळे किंवा लाल घेरे दिसू लागतात.