मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

शुभ प्रसंगी आंब्याची पाने का लावतात?

आंब्याचा झाड या नावाचे पर्याय आहे रसाल. अर्थात ज्याप्रकारे नृत्य रसांमध्ये शृंगार रस श्रेष्ठ तसेच भोजनात मधुरस श्रेष्ठ आहे, त्याचप्रकारे झाडांमध्ये रस या दृष्टीने आंब्याचे झाड सर्वश्रेष्ठ मानले आहे.
 
कागभुषुण्डीजी हे पर्वतावर राहत होते आणि ते जेव्हा जी मानसिक पूजा करायचे तर ती पूजा आंब्याच्या झाडाखाली उभे राहूनच करायचे. या प्रकाराच्या पूजनेत कोणत्याही सामुग्रीची गरज नसते. म्हणूनच म्हणतात की आंब्याच्या झाडाखाली मानस पूजा करणे 
 
 योग्य आहे. हेच कारण आहे की पाच वृक्ष पिंपल, बरगद, पाकर, गूलर आणि आंबा या पाच झाडांचे पाने मांगलिक कार्यांमध्ये ठेवले जातात. त्यातूनही आंब्याचे पाने सर्वश्रेष्ठ असल्याचे मानले गेले आहे.
 
परदेशात काही ठिकाणी आंब्याचे झाडे नसतात म्हणून तिथे मांगलिक कार्यांमध्ये विड्याची पाने वापरण्यात येतात. हे पर्याय आहे परंतू आंब्याचा झाडचं पवित्र असतं. कोकिळा सुद्धा या झाडालाच आपले सहचर समजून यावर बसून आपली मधुर आवाज काढते. तसेच आंब्याच्या मंजरीने कामदेवाची पूजा केली जाते.