1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

4 फेब्रुवारी : विश्व कॅन्सर दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या 2024 ची थीम

World Cancer Day 2024 : प्रत्येक वर्षी 4 फेब्रुवारीला विश्व कॅन्सर दिवस साजरा केला जातो. ज्याचा उद्देश्य कॅन्सर थांबवणे, ओळख, उपचार आणि याच्या प्रति लोकांमध्ये जागृतता तसेच याला घेवून लोकांना माहिती देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. वर्ष 2024 हा दिवस 4 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. कॅन्सर मुळे होणारे मृत्यु कमी करण्यासाठी हा विश्व कॅन्सर दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्देश्य आहे. 
 
वर्ष 1933 मध्ये सर्व प्रथम कॅन्सर दिवस स्विट्जरलैंडच्या जिनेवा शहरात साजरा केला गेला होता. वर्तमान काळात, जगभरात प्रत्येक वर्ष 76 लाख लोक कॅन्सर मूळे आपला जीव गमावतात. ज्यात 40 लाख लोक वेळेच्या पहिले 30 ते 69 वयात आपला जीव गमावतात. या आजाराबद्द्ल जागरूकता वाढवण्या सोबतच कॅन्सर सोबत लढण्याची व्यावहारिक रणनीति विकसित करणे हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश्य आहे. 
 
ही संस्था जगभरात पसरणाऱ्या कॅन्सर रोगला आटोक्यात आणण्यासाठी आणि मृत्युदराला कमी करण्यासाठी तसेच लक्षणांचे समर्थन करण्यासाठी यूनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलच्या (UICC) नेतृत्वात कार्यरत आहे माहिती अनुसार त्या वेळी साधारणता 12.7 लाख लोक कॅन्सरच्या आजाराने आपल्या जीवनाशी युद्ध करत होते प्रत्येक वर्षी 7 लाख लोकांचा जीव कॅन्सरने जात होता. 
 
कॅन्सरचा धोका कशामुळे आहे : कॅन्सरचा धोका मुख्यता खूप वेळापर्यंत रेडिएशनच्या संपर्कात राहिल्याने होतो. तंबाकू, गुटका, सिगरेट, दारूचे सेवन तसेच आनुवंशिक दोष, खराब पोषण, शारीरिक दुर्बलता, स्थूलपणा या कारणांमुळे अधिक होतो. यात मुख्य रूपाने गर्भाशयाचा कॅन्सर, सर्वाइकल कॅन्सर, ब्लड कॅन्सर, स्तन कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, गळ्याचा कॅन्सर, मस्तिष्कचा कॅन्सर, अंडाशयचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, इतर आहेत. यात विशेषत: कॅन्सरच्या सुरवतीचे लक्षण ओळखणे हीच जागरूकता आणणे महत्वाचे आहे. सोबत कॅन्सर बद्द्ल पसरलेले गैरसमज लाकमी करण्यासाठी आणि या आजाराशी लढत असलेल्या लोकांना हिम्मत देण्यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो .
 
वर्ष 2024 ची थीम काय आहे : या वर्ष विश्व कॅन्सर दिवसची थीम 'कॅन्सर केयर गॅप कमी करणे' अशी आहे. वर्ष 2022-2024 पर्यंत world cancer day कॅम्प चालवला जात आहे आणि या थीमचा मुख्य उद्देश्य कॅन्सरच्या लढाईत सर्व नागरिकांमध्ये समान देखभाल तसेच चांगले आरोग्यची सेवा मिळेल याच उद्देशाने ही मोहिम राबवली जात आहे.