1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : रविवार, 30 ऑक्टोबर 2022 (09:35 IST)

तुम्ही अनेकदा रात्रीचे जेवण वगळता का? या समस्या उद्भवू शकतात

वजन वाढणे ही बहुतेक लोकांची समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करतं? योगासने, व्यायामापासून ते आहार कमी करणे अशाअनेक पद्धती ते आजमावतात. अशात आजकाल वजन कमी करण्यासाठी दिवसातून एक वेळ खाण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे बरेच लोक रात्रीचे जेवण करत नाहीत. पण रात्री जेवण न केल्याने होणारे दुष्परिणाम तुम्हाला माहीत आहेत का?
 
जर तुम्ही डायटिंग करत असाल तर नक्कीच तुम्ही हलक्या आणि कॅलरी मुक्त पदार्थांकडे लक्ष दिले पाहिजे, परंतु तुम्ही रात्रीचे जेवण वगळू नये कारण यामुळे कमजोरी होऊ शकते. विशेषत: अनेक दिवस सतत रात्रीचे जेवण वगळल्याने त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ लागतो. रात्रीचे जेवण न केल्याने आरोग्याला होणाऱ्या आणखी अनेक हानींबद्दल जाणून घ्या-
 
उर्जा पातळी कमी होण्यास सुरवात होते
तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी ऊर्जावान राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये अनेक तासांचे अंतर असते. अशात रात्रीचे जेवण न केल्याने शरीरातील ऊर्जा पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे तुम्हाला खूप सुस्त आणि थकवा जाणवू लागतो. यासोबतच शरीराला पुरेसे पोषक तत्व न मिळाल्याने अशक्तपणाही येऊ लागतो.
 
झोप अपुरी राहते
तज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी हलके रात्रीचे जेवण घेणे जितके फायदेशीर आहे. रात्रीचे जेवण न करणेही तितकेच हानिकारक आहे. यामुळे तुमची भूक हळूहळू संपू लागते. उलट झोपताना रिकाम्या पोटी गॅस तयार होतो. त्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही आणि आरोग्यावरही परिणाम होऊ लागतो.
 
शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते
वजन कमी करताना कमी आहारात शरीराला पूर्ण पोषण देणं सर्वात मोठं काम आहे. अशात रात्रीचे जेवण न केल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळत नसल्याने पोषक तत्वांची कमतरता भासते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते.