शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

चुकूनही या भाज्या कच्च्या खाऊ नये

अनेकदा लोकं हेल्दी डायटच्या नावावर कच्च्या भाज्या खातात. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियम, फायबर्ससह इतर पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. आणि भाज्या उकळून किंवा शिजवून सेवन केल्याने त्यातील पौष्टिक तत्त्व नष्ट होतात हे खरं असले तरी प्रत्येक भाजी आपण कच्ची खाऊ शकत नाही. जाणून घ्या कोणत्या अश्या भाज्या आहे ज्या कच्च्या खाऊ नाही.
 
वांगी
कच्चे वांगी खाण्याचा प्रयत्न करू नये. वांग्यांमध्ये सोलानिन नामक तत्त्व मोठ्या प्रमाणात आढळतं. कच्चे वांगी खाल्ल्याने पोटात गॅसची समस्या होऊ शकते. म्हणून वांगी शिजवून खावे.
 
गाजर
गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आढळत ज्याने बॉडी व्हिटॅमिन ए मध्ये कन्वर्ट करते. गाजर शिजवल्यावर कॅरोटीनचे प्रमाण वाढतं. शरीरात पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता वाढवण्यात तसेच स्किनला पोषण मिळण्यासाठी ये आवश्यक तत्त्व आहे.
 
बटाटे
बटाट्यांमध्ये आढळणारे स्ट्रार्च पचण्यात समस्या बनू शकतात म्हणून बटाटे उकळून किंवा शिजवून खावे.
 
टोमॅटो
टोमॅटोमध्ये आढळणारे लाइकोपीनमुळे याचा रंग लाल असतो. यामुळे प्रोस्टेट कँसर आणि हार्टच्या समस्यांपासून सुटकारा मिळतो. टोमॅटो शिजवल्यावर त्यात आढळणारे टच सेल वाल्स ब्रेक डाउन होतात आणि लाइकोपीन रिलीज करतात. यामुळे हे शरीरात शोषले जातात.
 
ब्रोकली
ब्रोकली आणि कोबीत कठोर घटक आढळतात. या भाज्या चांगल्यारीत्या शिजवून न खाण्याने पचण्यात समस्या येते.
 
बींस
बींसमध्ये फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, फोलेट्स, फोटो पोषक घटक, व्हिटॅमिन आणि इतर पोषक तत्त्व आढळतात. उकळून खाल्ल्यास हे सर्व पोषक तत्त्व आपल्याला मिळू शकतात. मधुमेहावर उकळलेले बींस उपयोगी ठरतात. 5 मिनिट बींस उकळून त्यावर मीठ आणि काळ्या मिर्‍याची पूड घालून खाऊ शकता.
 
पालक
पालक अनेकदा सलॅड म्हणून खाण्यात येतं. कच्चा पालक खाणे धोकादायक ठरू शकतं. पालक शिजवल्यावर त्यात आढळणार्‍या आयरन आणि मॅग्नेशियम तत्त्वांमध्ये वाढ होते.
 
रताळे
रताळ्यांमध्ये आयरन, फोलेट, कॉपर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन्स इतर आढळतं, याने इम्यून सिस्टम मजबूत होतं. रताळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे कार्बोहाइड्रेट शरीरासाठी आवश्यक असतं. याचे दुप्पट गुण मिळवण्यासाठी रताळे उकळून खावे.