शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

साखर शरीराला किती हानिकारक आहे जाणून घ्या!

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. "त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते." साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते. हे कसे काय घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...
 
(१) साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला!
 
(२) गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही. 
 
(३) साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.  
 
(४) साखरेमुळे शरीराचे वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो. 
 
(५) साखर ही रक्तदाब वाढवते.
 
(६) साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.
 
(७) साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.
 
(८) साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेवीस हानीकारक रसायने वापरली जातात.
 
(९) साखर ही मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.
 
(१०) साखर हे पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.
 
(११) साखर ही शरीरातील ट्राइ ग्लिसराइड वाढवते.
 
(१२) साखर हे पेरेलिसिसचा झटका अथवा लकवा होण्याचे एक मुख्य कारण आहे.