मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

'आधार' ची मदत, हरवलेली ५०० मुले सापडली

केंद्र सरकारने विविध योजनांसाठी आधार सक्‍ती केली आहे. या विरोधात देशातून अनेकदा आवाजही उठत असतो.  मात्र, या माहितीमुळेच देशात हरवलेली ५०० मुले सापडली आहेत.
 
आधारकार्डमुळे हरवलेली ५०० मुले सापडल्याचा दावा युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडियाचे (यूआयडीएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी केला आहे. या मुलांना विविध ठिकाणच्या अनाथ आश्रमात ठेवण्यात आले होते. त्यांची बायोमॅट्रिक पद्धतीने ओळख पटवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.