शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (10:24 IST)

राज यांची व्यंगचित्रातून सरकारवर टीका

हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.  “देशाचे रखवालदार बदलले तरीही परिस्थिती काही बदलली नाही, आताचे रखवालदारही झोपा काढण्याचं काम करत असल्यामुळे विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखी माणसं बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून जात असल्याची”, टीका राज ठाकरेंनी केली आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर राज ठाकरेंनी मोदी-जेटली जोडीवर टीका करणारं व्यंगचित्र टाकलेलं आहे.