1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2023 (21:26 IST)

सातारच्या ‘त्या’ पावसातील सभेचे श्रेय माझ्याकडे नाही-शरद पवार यांनी नमूद केले

sharad pawar
शरद पवार यांनी भर पावसात घेतलेली सभा चांगलीच गाजली होती. यानंतर राज्यातील राजकीय चक्रे फिरल्याचे बोलले जाते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणूक प्रचारासाठी साताऱ्यात ही सभा झाली होती. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, साताऱ्याच्या सभेचे श्रेय माझ्याकडे नाही. मी बोलायला उभा राहिलो आणि पाऊस आला. मला वाटले आता सभा संपली. पण लोकांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या. तेव्हा माझ्या लक्षात आले की लोकांना ऐकायचे आहे. मग मी बोलत राहिलो. लोकांनी ऐकले. अन् आमचा उमेदवारही निवडून दिला. त्या सभेचा व्हिडिओ सर्वत्र फिरले. राज्यभरातून त्याचे कौतुक झाले. ती सभा ऐतिहासिक ठरली होती, असे शरद पवार यांनी नमूद केले.
 
दरम्यान, क्रिकेट माझे क्षेत्र नव्हते. माझे सासरे क्रिकेटर होते. माझ्या लग्नाला क्रिकेटर हजर होते. त्यानंतर क्रिकेटशी जवळीक निर्माण झाली. गरवारे क्लबचे भांडण होते. ते मिटत नव्हते. म्हणून त्या संघटनेच्या निवडणुकीला मी उभा राहिलो आणि निवडून आलो. मी कधी क्रिकेटमध्ये राजकारण येऊ दिले नाही. ज्या दिवशी भारत देश क्रिकेटमध्ये अव्वल झाला, त्यावेळी मी राजीनामा दिल्याचे पवार यांनी सांगितले.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor