देशातील बँकांच्या अचूक आणि योग्य व्यवस्थापनामुळे मंदीच्या काळातही भारतीय बँका खंबीरपणे उभ्या ठाकल्याचे सांगत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी भारतीय बँकांवर स्तुतिसुमनांची उधळण केली आहे. प्रणव यांच्या हस्ते कॅनरा बँकेच्या 104 शाखांचे उद्घाटन करण्यात आले यानंतर ते बोलत होते.