1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

"अफसर कवि" हरिशंकर परसाई

Harishankar Parsai
सुप्रसिद्ध व्यंगकार लेखक हरिशंकर परसाई ह्यांचा जन्म मध्यप्रदेशाच्या  होशंगाबाद येथे 22  ऑगस्ट 1924  मध्ये झाला होता. हलक्या फुलक्या विनोदात टोमणा मारून समाजातील अत्यंत कठीण समस्यांना समोर ठेवण्यामध्ये त्यांचे प्रभुत्व होते. व्यंगला शैलीचा दर्जा देणारे ते हिंदीतील पहिले होते.
 
“अफसर कवि” ही रचना मूल हिंदी भाषेत लिहिली गेली आहे. हे त्यांचे मजेदार-व्यंग्यात्मक काम आहे. हरिशंकर परसाई ह्यांची लिहिली "अफसर कवि",व्यंग रचना:-
 
"अफसर कवि"
एक कवी होते. ते राज्य सरकारचे अधिकारीही होते. जेव्हा अफसर सुट्टीवर गेला तेव्हा ते कवि व्हायचे आणि जेव्हा  कवी सुट्टीवर गेला की ते अधिकारी व्हायचे.
 
एकदा पोलिसांची  गोळीबार झाली आणि 10-12 लोक मारले गेले. त्यांचे आतील अधिकारी तेव्हा सुट्टीवर गेला आणि या घटनेनंतर कवी अस्वस्थ झाला. त्यांनी एक कविता लिहिली आणि प्रकाशित केली. कवितेत घटनेची आणि मुख्यमंत्र्यांची निंदा केली.
 
ही कविता कुणीतरी मुख्यमंत्र्यांना वाचून दाखवली. तोपर्यंत अधिकारी सुट्टीवरून परतले होते. त्यांना ह्याची माहिती पडली तर ते घाबरले आणि कवीला सुट्टीवर पाठवले. अधिकारी कवी यांनी एका प्रभावशाली नेत्याला धरलं. म्हणाले - मला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन चला. त्यांच्याशी माफी मिळून द्या. नेता त्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. त्यांनी स्वतःचा परिचय दिला ही होता की कवीने मुख्यमंत्र्यांच्या चरणी डोकं ठेवलं. मुख्यमंत्री म्हणाले- हा तो कवी होऊच शकत नाही ज्यांनी ती कविता लिहिली होती.
 
त्यांचे  प्रमुख काम; कथा संग्रह:-
हँसते हैं रोते हैं, जैसे उनके दिन फिरे, भोलाराम का जीव; उपन्यास: रानी नागफनी की कहानी, तट की खोज, ज्वाला और जल; संस्मरण: तिरछी रेखाएँ; लेख संग्रह: तब की बात और थी, भूत के पाँव पीछे, बेइमानी की परत, अपनी अपनी बीमारी, प्रेमचन्द के फटे जूते, माटी कहे कुम्हार से, काग भगोड़ा, आवारा भीड़ के खतरे, ऐसा भी सोचा जाता है, वैष्णव की फिसलन, पगडण्डियों का जमाना, शिकायत मुझे भी है, उखड़े खंभे , सदाचार का ताबीज, विकलांग श्रद्धा का दौर, तुलसीदास चंदन घिसैं, हम एक उम्र से वाकिफ हैं, बस की यात्रा;

- हर्षिता बारगल