शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 डिसेंबर 2017 (12:49 IST)

केरळ आणि तामिळनाडूमध्ये ओखी वादळाचा धुमाकूळ

थिरुवनंतरपुरम : केरळ आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावर ओखी वादळाने धडक दिली. सुमारे 110 ते 120 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनी किनारपट्टीवर अक्षरश: धुमाकूळ घातला. या वादळाच्या दरम्यान अनेक मच्छिमार बेपत्ता झाले असून, तब्बल 218 मच्छिमारांना वाचवण्यात तटरक्षक दल आणि नौसेनेला यश आलं.
 
दरम्यान, पुढची सूचना मिळेपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कन्याकुमारीसह दक्षिण तामिळनाडूतल्या 5 जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.