मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 4 डिसेंबर 2017 (15:53 IST)

ओखी वादळ मुंबईजवळ वातावरण बदलले

ओखी वादळमुंबईपासून अवघ्या ६७० किलोमीटर अंतरावर असून वादळ पुढेगुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे पुणे वेधशाळेचे म्हणणे आहे. यामुळे पश्चिम भागात पावसाची शक्यता आबे.  थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो मात्र मोठ्या प्रमणात बदल होणार आहे.किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली.  भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकलेल्या ‘ओखी’ वादळाचे थैमानाने ३५ बळी घेतले.   ताशी १३० कि. मी वेगाने हे वादळ लक्षद्वीपवर धडकले.  पुढे हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकण्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.