शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 सप्टेंबर 2017 (09:18 IST)

पावसाने केली समुद्रकिनारी असेलेली सुरुची झाडांची बाग उध्वस्त

प्रसिद्ध असलेला आणि  पालघर येथील  केळवे बीच, चिंचणी या समुद्रकिनारी  पावसानं अक्षरश: थैमान घातले आहे. यामध्ये पाऊस इतका भयानक होता की यात आलेल्या  वादळात, केळवे बीच भागातली सुरुची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. ही प्रसिद्ध बाग आहे. या बागेची स्थिती पहिली तर लक्षात येते की पावसाचा जोर किती असेल.

अविरतपणे कोसळणाऱ्या पावसामुळे ही बाग उद्धवस्त झाली आहे.   पालघर ,विरारमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे विरार  स्टेशनबाहेर अक्षरश: गुडघाभर पाणी साचलं  आहे.त्यामुळे मुंबईकर वैतागले असून अनेक ठिकाणी रेल्वे बंद आहे. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईमध्येहीकोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडतो आहे.