गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 डिसेंबर 2018 (09:20 IST)

ठाणे : काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद

ठाण्यातील काही भागातला पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आणि लघुपाटबंधारे विभाग यांच्याशी झालेल्या बैठकीनुसार जांभूळ जलशुद्धीकरण येथून होणारा पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी आज रात्री १२ ते उद्या दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजी रात्रौ १२ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
 
या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना केले आहे. 
 
दुसरीकडे धरणांमधील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकरणाने ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १४ टक्के कपात केली असताना आता भातसा धरणातील पाणी पुरवठ्यावरही निर्बंध आले आहेत. भातसातून ठाणे शहराला दररोज २०० एमएलडी पाणीपुरवठा होत असून त्यात १० टक्के कपात केली जाणार आहे. तसे पत्र पालिकेला प्राप्त झाले असून ही कपात दररोज न करता आठवड्यातून एक दिवस करावी, अशी मागणी पालिकेने लघुपाटबंधारे विभागाकडे केली आहे.