हिंसात्मक चित्रे घरात लावू नयेत
चित्रांवर बरेच काही अवलंबून असते. आपण पाहतो त्या चित्रावरून अनेकदा आपले भाव ठरतात. म्हणूनच घरात हिंसाप्रधान चित्रे लावू नयेत. विशेषतः नैऋत्य कोपर्यात हिंसेशी संबंधित कोणतेही चित्र नको. हा कोपरा नात्यांशी निगडित असतो. नैऋत्य दिशेला युद्ध किंवा जंगली प्राण्याचे चित्र लावले, तर त्यामुळे कुटुंबीयांबरोबरचे संबंध बिघडू शकतात.महाभारतातील दृश्य किंवा हत्याराचे चित्र घरात भांडणे निर्माण करू शकतात. कारण यातून हिंसा ओसंडून वाहत असते. या चित्रांमुळे आपले प्रियजनांशी संबंध बिघ़डू शकतात. एकत्र कुटुंबात हे चित्र नेहमीच सासू-सुनेमध्ये होणार्या भांडणाचे मुख्य कारण ठरले आहे.
श्रीकृष्ण अर्जुनाला 'भगवदगीते'चा उपदेश करत आहे, या महाभारतातील चित्रात काय वाईट आहे, हा प्रश्न लोकांनी अनेक वेळा विचारला आहे. याचे उत्तर हे आहे की, या चित्रात युद्ध करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. अशा प्रकारचे चित्र घरात असल्याने अशी शक्यता असते की, त्यातून प्रेरणा घेऊन आपले मनही नेहमी लढण्याकरता सिद्ध होत असावे.