हा तर जुगार-शिवसेनाप्रमुख
मुंबईत क्रिकेटपटूंचा पार पडलेला लिलाव म्हणजे 'उद्योगपतींकडून खेळण्यात आलेला जुगार' अशी संभावना करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांना हा 'जुगार' थांबविण्याचे आवाहन केले.
यासंदर्भात श्री. पवार यांना लिहिलेले एक पत्र सामनाच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात पैशाचे असे प्रदर्शन भारतीय क्रिकेटसाठी चांगले नाही, असे सांगून सुभाष चंद्रा यांच्या इंडियन क्रिकेट लीगला शह देण्यासाठीच हे सारे काही सुरू करण्यात आले आहे, असे त्यात म्हटले आहे. 'अहो, पवार क्रिकेटसाठी हे काही बरे नाही, असे सांगून बाळासाहेब पुढे म्हणतात, की उद्योगपती आपला पैसा क्रिकेटच्या मैदानावर फेकत आहेत आणि त्यामुळे हे क्षेत्र भ्रष्ट होत आहे. क्रिकेटपटू विकत घेतले जात आहेत. त्यामुळे त्यांचे लक्ष खेळावर केंद्रीत होणार नाही व या देशातून खेळाविषयीची आवड कमी कमी होत जाईल.
अशा प्रकारे उद्योजक त्यांच्या पैशांचा वापर करू लागले तर एक दिवस असाही येईल, त्यावेळी सरकारचीही गरज भासणार नाही अशी भीती व्यक्त करून, हेच उद्योजक देश चालवतील. त्यामुळे उद्योगपतींनी चालविलेला हा जुगार थांबवा आणि क्रिकेट वाचवा. पवार, तुमच्यात ती ताकद आहे. नाही का? असा आवाहनवजा सवाल बाळासाहेबांनी पवारांना अखेरीस केला आहे.
यासंदर्भात श्री. पवार यांना लिहिलेले एक पत्र सामनाच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात पैशाचे असे प्रदर्शन भारतीय क्रिकेटसाठी चांगले नाही, असे सांगून सुभाष चंद्रा यांच्या इंडियन क्रिकेट लीगला शह देण्यासाठीच हे सारे काही सुरू करण्यात आले आहे, असे त्यात म्हटले आहे. 'अहो, पवार क्रिकेटसाठी हे काही बरे नाही, असे सांगून बाळासाहेब पुढे म्हणतात, की उद्योगपती आपला पैसा क्रिकेटच्या मैदानावर फेकत आहेत आणि त्यामुळे हे क्षेत्र भ्रष्ट होत आहे. क्रिकेटपटू विकत घेतले जात आहेत. त्यामुळे त्यांचे लक्ष खेळावर केंद्रीत होणार नाही व या देशातून खेळाविषयीची आवड कमी कमी होत जाईल.
अशा प्रकारे उद्योजक त्यांच्या पैशांचा वापर करू लागले तर एक दिवस असाही येईल, त्यावेळी सरकारचीही गरज भासणार नाही अशी भीती व्यक्त करून, हेच उद्योजक देश चालवतील. त्यामुळे उद्योगपतींनी चालविलेला हा जुगार थांबवा आणि क्रिकेट वाचवा. पवार, तुमच्यात ती ताकद आहे. नाही का? असा आवाहनवजा सवाल बाळासाहेबांनी पवारांना अखेरीस केला आहे.
