1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

रणजीत गांगुली फ्लॉप!

दिल्लीतील करनॅल सिंह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रेल्वे विरोधातील रणजी सामन्यात बंगाल संघाची चांगलीच वाताहात झाली. संघात गांगुलीसारखा अनुभवी खेळाडू असताना संघ 201 धावातच तंबूत परतला.

नाणेफेक जिंकत बंगालने प्रथम फलंदाजी करण्‍याचा निर्णय घेतला. अरिंदम दास, जतिमोनी बसु दिबयेंदू चक्रवर्ती आणि कर्णधार मनोज तिवारी लवकरच तंबूत परतले.

यानंतर आलेल्या दादाकडून सार्‍यांना आशा होत्या. परंतु सौरव केवळ 13 धावाच करत परतल्याने बंगालचा डाव 201 धावांवर संपला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा