'लेखनाचे संस्कार सोडून जात नाहीत'
लेखक आपले शब्द कागदावर उमटवतो, वक्ता ते श्रोतृहृदयावर उमटवतो. कागदावरचे शब्दसुद्धा कालांतराने विसरले जाऊ शकतात. काही काळ त्यांनी केलेला संस्कार बाकी कायम राहतो. पुढे पुढे लेखकाचे व पुस्तकाचे नावही लक्षात राहत नाही. पण त्या लेखकाने आपल्या लेखनाद्वारे केलेले संस्कार माणसाला सोडून जात नाहीत. लेखनामुळे त्याच्या वृत्तीत, जाणिवेत व एकूणच मानसिकतेत जो सूक्ष्म बदल झालेला असतो, तो तात्काळ लक्षात येत नाही. विद्वत्ता व बहुश्रुतता प्रदर्शित करण्यासाठी पुष्कळदा लेखनातील काही अंश उपयुक्त ठरतात ही गोष्ट खरी आहे. पण त्या उद्धरणांचा माणसाच्या मानसिकतेशी संबंध अल्प असतो व प्रदर्शनप्रियतेशी अधिक असतो. व्याख्यानाच्या बाबतीत तेवढे करता न आले, तरी अंतरिक संस्कारशीलतेच्या दृष्टीने लेखन आणि वक्तृत्व यांच्यातील साम्य लक्षात यायला हरकत नाही.(
पणजी येथे १९९४ मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनातील भाषणाचा सारांश) (
छायाचित्र सौजन्य विवेक रानडे)