सिंग इज किंग
|
अणू कराराच्या मुद्यावरून डाव्या पक्षांनी पाठिंबा काढल्यानंतर सरकार अल्पमतात आले होते. डावे तसेच भाजपनेही सरकारने विश्वासमत सिद्ध करून दाखवावे असे आव्हान दिले होते. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना डाव्यांनी पाठिंबा काढून घेण्याचे पत्र दिल्यानंतर त्यांनीही सरकारला बहूमत सिद्ध करण्यास सांगितले होते. त्यानुसार आज हे मतदान घेण्यात आले.
सरकारच्या सहाय्यासाठी समाजवादी पक्ष धावून आला तरी सरकारला बहूमत प्राप्त करण्यासाठी बरीच उठाठेव करावी लागणार होती. पण मतदान झाल्यानंतर मात्र जे चित्र दिसले ते खूपच वेगळे दिसले. सरकारने तब्बल १९ मते जास्त मिळवून विश्वासदर्शक ठराव जिंकला. शिवाय ५४१ पैकी ८ खासदार अनुपस्थित राहिले. त्याचाही फायदा सरकारला मिळाला. अर्थात ते उपस्थित राहिले असते तरीही सरकारने हा ठराव जिंकला असताच, हे आकडेवारीहूनही स्पष्ट होते.
