घरातील ताणतणावांपासून सुटका मिळवण्यासाठी माणूस काय नाही करत? वास्तुमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि घरात कटकटी होण्यास सुरुवात होते अशा वेळेस घराच्या रचनेत थोडा बदल करून रोजच्या कटकटींपासून मुक्तता मिळू शकते. घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यावेळी विचारातसुद्धा मोकळेपणा येतो.
*नकारात्मक ऊर्जा काय आहे अडगळीच्या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. याने घरात रोग, क्लेश आणि दुःखांचा वास होतो. म्हणूनच कुटुंबाच्या शांतीसाठी या वस्तूंना बाहेर काढून टाकावे व कमी आणि आवश्यक वस्तूंनाच घरी ठेवायला हवे.
काय करावे? * घरात जमलेली धूळ-माती रोज साफ करावी. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. * बंद पडलेले घड्याळ व अडगळीचे सामान बाहेर काढावे. * देवी-देवतांच्या मूर्ती शो-पीसच्या रूपात सजवू नये. * एकाच देवी-देवतांची जास्त मुर्ती ठेवू नये. * घर सामानाने गच्च भरण्यापेक्षा थोडी मोकळी जागा ठेवायला हवी. * मुलांची जुनी खेळणी नियमितपणे साफ करायला हवी.