संबंधित माहिती
- RCB vs MI Playing 11: बंगळुरूचा संघ मुंबईविरुद्ध जिंकण्याचा प्रयत्न करेल,प्लेइंग 11 जाणून घ्या
- Jofra Archer: जोफ्रा आर्चर आयपीएलनंतर थेट अॅशेस मालिका खेळण्यासाठी जाणार
- RR vs SRH Playing 11: सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान विजयासाठी लढणार
- IPL 2023: चॅम्पियन गुजरात टायटन्सला मोठा धक्का अनुभवी खेळाडूकेन विल्यमसन आयपीएल स्पर्धेतून बाहेर
- LSG vs DC लखनौ सुपर जायंट्सने दिल्लीवर विजयाची हॅटट्रिक केली
रोहित शर्माला भासतेय बुमराहची कमी?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स प्रथमच आयपीएलमध्ये आपला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. या सामन्यात मुंबई संघाला 172 धावांचे लक्ष्य वाचवण्यात अपयश आले. या सामन्यात मुंबईच्या एकाही गोलंदाजाला फाफ डू प्लेसिस आणि किंग कोहलीची विकेट घेता आली नाही.
मात्र, युवा वेगवान गोलंदाज अर्शद खानने शेवटच्या षटकात फाफची विकेट घेतली. पण, तोपर्यंत फॅफने आपले काम केले होते. रोहित शर्माने मॅचनंतर एक भावनिक वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला की,
“पहिल्या सहा षटकांत फलंदाजी चांगली झाली नाही. पण, टिळक आणि इतर काही फलंदाजांकडून हा खरोखर चांगला प्रयत्न होता. पण, आम्ही चेंडूवर चांगली कामगिरी केली नाही. फलंदाजीसाठी ती चांगली खेळपट्टी होती. (टिळक वर्मा यांच्यावर) तो एक सकारात्मक व्यक्ती आहे, खूप प्रतिभावान देखील आहे. त्याने खेळलेल्या मोजक्या शॉट्समध्ये त्याने खूप धैर्य दाखवले.
आम्हाला स्पर्धात्मक टोटलवर नेल्याबद्दल टिळकांना सलाम. फलंदाजीसाठी ती चांगली खेळपट्टी होती. आम्ही लक्ष्य निश्चित केले नाही परंतु आम्ही आमच्या क्षमतेच्या निम्म्यापर्यंत फलंदाजी केली नाही आणि आम्ही 170 पर्यंत पोहोचलो. कदाचित आणखी 30-40 धावा केल्या असत्या.”
रोहित शर्मा बुमराहशिवाय खेळायला शिकला आहे
या सामन्यात रोहित शर्माचा संघ आरसीबीच्या फलंदाजीपुढे शरणागती पत्करताना दिसला. मैदानावर फक्त षटकार आणि चौकारांचा पाऊस पडत होता. मुंबईचे गोलंदाज एकामागोमाग एक रचत गेले. दरम्यान, रोहित बुमराहबद्दल पुढे म्हणाला की,
होय, त्याची कमतरता भासते पण गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून मला जसप्रीत बुमराहशिवाय खेळण्याची सवय आहे. अर्थात हा वेगळा सेटअप आहे पण कोणीतरी हात वर करून स्टेप वर जाणे आवश्यक आहे. दुखापत आमच्या नियंत्रणात नाही, आम्ही त्याबद्दल फार काही करू शकत नाही. सेटअपमधील इतर लोक देखील खूप प्रतिभावान आहेत. आपण त्यांना तो आधार द्यायला हवा. सीझनचा पहिला गेम, खूप उत्सुकता आहे."
विशेष म्हणजे या सामन्यात मुंबईला 22 चेंडू शिल्लक असताना 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात वेगवान फलंदाजी केल्याबद्दल विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला. त्याने 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 82 धावांची स्फोटक खेळी खेळली.
पुढील लेख
