निशाणी डावा अंगठा
|
'काय द्याचं बोला?' ची पटकथा लिहिणारे अजित व प्रशांत दळवी यांनीही 'निशाणी'ची पटकथा लिहिली आहे. हे दोघेही मराठवाड्यातीलच असल्याने कादंबरीतील विषयाला आणि भाषेला तेच न्याय देऊ शकतील, असे वाटल्याने बेर्डे यांनी त्यांच्याकडे हे काम सोपवलं. या चित्रपटात अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, मिलिंद शिंदे, निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, शशांक शेंडे ही मंडळी आहेत.
या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मकरंद अनासपुरे याने यात एक गाणं गायलं आहे. संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मकरंद चक्क गायलाय. त्यामुळे त्याचे गाणे पहाणे आणि ऐकणे हाही एक चांगला अनुभव ठरेल.
