1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. झळा दुष्काळाचा

पाण्यासाठी जनता कासावीस

WD
कोरेगाव तालुक्यातील उत्तर व पूर्व भागातील सुमारे 50 ते 60 गावात पिण्याच्या पाण्याची कमी अधिक प्रमाणात टंचाई जाणवत असून अनेक ठिकाण्याच्या नळपाणी पुरवठा करणार्‍या पाणी योजना दुष्काळामुळे बंद पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना रात्रंदिवस भटकंती करावी लागत असून कोरेगाव तालुक्यातील उत्तर व पूर्व भागातील जनता पाण्यासाठी कासावीस झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान बड्या बागायतदारांपासून शेतमजूरांपर्यंत व ठोक व्यापार्‍यांपासून टपरी वाल्यापर्यंत सगळेच जण दुष्काळाच्या विळख्यात सापडले आहेत. उत्तर कोरेगाव भागातील अनेक गावात नोव्हेंबर पासून पाण्याचे टँकर सुरू आहेत. या भागातील विविध गावांच्या परिसरातील पाण्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा