Last Modified: नागपूर , रविवार, 21 नोव्हेंबर 2010 (12:54 IST)
200 च्या आत कीवी गारद!
तिसर्या व अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व निर्माण झाल्याने पाहुण्या न्यूझीलंड संघाची चांगलची दाणादाण उडाली आहे. पाहुण्यांचा अख्खा संघ 193 धावांमध्ये गारद झाला आहे.
पहिल्या दिवशी भारताने चांगली कामगिरी करत न्यूझीलंडच्या अर्ध्या संघाला तंबू दाखवला होता. आज जेसी रायडर व ब्रँडन मॅकुलम यांनी काढलेल्या धावा वगळता इतर एकाही खेळाडूचा निभाव भारतीय गोलंदाजांपुढे लागला नाही.
इशांतने 43 धावा देत चार तर प्रज्ञान ओझाने 57 धावा दे तीन गडी बाद केले. आता भारतीय फलंदाजांकडून आशा आहेत.