CSK vs MI :रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांच्या अर्धशतकांमुळे चेन्नईने मुंबईचा चार विकेट्सने पराभव केला
रचिन रवींद्र आणि ऋतुराज गायकवाड यांच्या अर्धशतकांमुळे, चेन्नई सुपर किंग्जने (CSK) मुंबई इंडियन्स (MI) ला चार विकेट्सने हरवून विजयाने सुरुवात केली. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत नऊ गडी गमावून 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात, सीएसकेने 19.1 षटकांत सहा गडी गमावून 158 धावा केल्या आणि सामना जिंकला.
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सीएसकेच्या होम ग्राउंड चेपॉकवर खेळवण्यात आला. एका सामन्याच्या बंदीमुळे हार्दिक पांड्या या सामन्यात खेळला नाही आणि त्याच्या जागी सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्सला हंगामाच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 155धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक 31 धावा केल्या. शेवटी, दीपक चहर15चेंडूत 28 धावा करून नाबाद परतला. चेन्नईकडून नूर अहमदने 4 विकेट्स घेतल्या. तर खलील अहमदने 3 विकेट्स घेतल्या. सीएसकेने हे लक्ष्य 19.1 षटकांत पूर्ण केले. चेन्नईकडून रचिन रवींद्रने 45 चेंडूत 65 धावा करत नाबाद राहिला. तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याच्याशिवाय कर्णधार ऋतुराज गायकवाडने 26चेंडूत 53 धावांची शानदार खेळी केली.
Edited By - Priya Dixit