संबंधित माहिती
- भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला
- श्रेयस अय्यर इंग्लंडमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला
- हार्दिक पांड्याला भेटण्यासाठी त्याने १२ तास सायकल चालवली, चाहत्याला दिले दीड लाख रुपये
- ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजवर ८ गडी राखून विजय मिळवत महिला टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला
- क्रिकेट कारकीर्द वाढवण्यासाठी हार्दिक पांड्याने मुंबई सोडून बंगळूरुला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला
भारत 'अ' संघाने नाणेफेक जिंकून श्रीलंकेविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
भारत आणि श्रीलंका 'अ' संघ यांच्यात खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या अनधिकृत कसोटी मालिकेतील दुसरा सामना गॉल स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखाली भारतीय 'अ' संघ सध्या दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या अनधिकृत कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली, परंतु सामना अखेरीस अनिर्णित राहिला. गॉल स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय 'अ' संघाचा कर्णधार ध्रुव जुरेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत भारतीय कसोटी संघातील अनेक महत्त्वाचे खेळाडू सहभागी होत आहे, ज्यात प्रामुख्याने साई सुदर्शन आणि कर्णधार जुरेल यांचा समावेश आहे.
या सामन्यासाठी दोन्ही संघांतील ११ खेळाडू
भारत अ संघ: साई सुदर्शन, अमन मोखाडे, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल (कर्णधार, यष्टिरक्षक), शेख रशीद, सरांश जैन, जीशान अन्सारी, आकिब नबी, यश ठाकूर, गुरनूर ब्रार.
श्रीलंका-अ संघ - पवंथा वीरासिंघे, सोहन डी लिवेरा, नुवानिडू फर्नांडो, अशेन बंडारा, सहान अरचिगे (कर्णधार), अंजला बंडारा (यष्टीरक्षक), चमिका गुणसेकरा, दिलम सुदिरा, केशरा नुवांथा, दुलाज समुदिथा, असांका मनोज.
Edited By- Dhanashri Naik
