1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

तर भारताला ''पॅकअप'' करावा लागेल!

ND
विश्वकरंडकच्या बाद फेरीत कोणता संघ प्रवेश करणार आहे याबाबत आता बरीच उलटपलट होण्याची शक्यता आहे. जर द. आफ्रिका, वेस्टइंडिज, इंग्लंड आणि बांगलादेश या संघांनी आपापल्या लढतीत उलटफेर केला तर टीम इंडियाचे 'पॅकअप' निश्चित आहे.

आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अखेरच्या षटकात नेहराच्या हाती चेंडू ‍देऊन आपला पराभव स्वीकारला. कर्णधार धोनीला नेतृत्वाचा ठसा उमटविण्यात साफ अपयश आले आहे. आफ्रिकेविरुद्ध महत्वाच्या लढतीत अश्विनला संघात घ्यायला हवे होते पण या सार्‍या चर्चा थंड झाल्या असून आता बाद फेरीचे दरवाजे बंद करण्यासाठी अन्य संघांनी नवीन योजन आखली आहे.

आफ्रिका आयर्लंडचा परभाव करून दोन गुणांची कमाई करणार ह निश्चित आहे. बांगलादेश आणि द. आफ्रिका यांच्यात साखळीतील अखेरची लढत होईल. त्या लढतीत बांगलादेश आफ्रिकेला पराभूत करून बाद फेरीतील आपली जागा पक्की करणार. आफ्रिका व बांगलादेश यांचे 8-8 असे समान गुर होतील पण नेट रनरेटच्या आधारे आफ्रिका वरचढ ठरेल. इंग्लंड, वेस्टइंडिज यांच्यातील सामना एकतर्फी होऊन इंग्लंडचा विजय झाला तर टीम इंडियाचे स्थान निश्चित धोक्यात येईल. सद्या टीम इंडियाने आघाडीचे स्थान पटकविले असले तरीसुद्धा शेवटच्या लढतीत विंडिजविरूद्ध पराभव झाला तर त्याला आपले पॅकअप करावे लागेल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा