Last Modified: मोहाली , बुधवार, 30 मार्च 2011 (23:25 IST)
भारत अंतिम फेरीत!
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा २९ धावांनी विजय मिळविल्यानंतर भारतीय खेळाडूंनी मैदानात जल्लोष केला. भारतातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींनी भारताचा विजय विश्वकरंडक जिंकल्यासारखा जल्लोष साजरा केला.
उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानपुढे विजयासाठी ठेवलेल्या २६१ धावांच्या आव्हानासमोर पाकिस्तानला ५० षटकांत २३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलेल्या अर्धशतकी (८५) खेळी आणि हरभजन सिंग, मुनाफ पटेल, आशिष नेहरा आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवीत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.