महाराष्ट्र एसटी महामंडळाने १५ एप्रिलपासून बस भाड्यात १०% हंगामी वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला
महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (MSRTC) १५ एप्रिलपासून तिकीट दरात १०% हंगामी वाढ लागू करण्याचा अधिकृत निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळाच्या नियमांनुसार, दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि प्रमुख सणांसारख्या गर्दीच्या काळात भाडेवाढ करण्याचा अधिकार प्रशासनाने राखून ठेवला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या लागतात, ज्यामुळे सामान्यतः प्रवासी संख्येत मोठी वाढ होते. याचा फायदा घेण्यासाठी आणि वाढता परिचालन खर्च भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे नवीन भाडे दर प्रामुख्याने सामान्य आणि सुपरफास्ट बस सेवांना लागू होतील. काही प्रीमियम सेवा वगळल्या जाऊ शकतात, परंतु सर्वाधिक वापरली जाणारी बस सेवा असलेल्या एसटी बसने प्रवास करणे आता अधिक महाग होणार आहे.
नवीन भाडे रचनेनुसार, प्रवाशांना आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ₹100 पर्यंत अधिक खर्च करावा लागू शकतो.
Edited By- Dhanashri Naik