महाराष्ट्रात राज्यात ६.५ लाख कोटी रुपयांच्या अणुऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली
राज्यात ६.५ लाख कोटी रुपयांच्या अणुऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे १.२३ लाख नोकऱ्या निर्माण होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने अणुऊर्जा क्षेत्रात ६.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी चार प्रमुख कंपन्यांसोबत करार केले आहे. या प्रकल्पांमधून राज्यात २५,४०० मेगावॅट वीज निर्माण होईल. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यात अंदाजे १.२३ लाख नवीन नोकऱ्या निर्माण होतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ही गुंतवणूक देशाला शून्य-कार्बन आणि ऊर्जा-समृद्ध बनवण्यात मोठी भूमिका बजावेल. रिलायन्स, अदानी, एनटीपीसी आणि बजाज ग्रुप संयुक्तपणे या प्रकल्पांवर काम सुरू करतील.
Edited By- Dhanashri Naik