पहिल्या वर्गापासून हिंदी शिकवली तर शाळा बंद करू,' राज ठाकरेंचा फडणवीसांना इशारा
Maharashtra News: सध्या राज्यात हिंदी मराठी मुद्दा तापला आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची केली गेली तर "आम्ही शाळा बंद करण्यास मागेपुढे पाहणार नाही."तसेच महाराष्ट्रातील जनतेला सतर्क राहण्याचे आणि हिंदी लादण्याच्या सरकारच्या कोणत्याही योजनेला हाणून पाडण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला आहे. मीरा भाईंदर येथे एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
फडणवीस यांनी गुरुवारी आग्रह धरला की सरकार त्रिभाषा धोरण निश्चितपणे लागू करेल, परंतु हिंदी पहिलीपासून शिकवायची की पाचवीपासून हे या मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीद्वारे ठरवले जाईल. असे विधान केले होते
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात फडणवीस यांना हिंदी लादण्याचे आव्हान दिले. ते म्हणाले, 'जेव्हा त्यांनी एकदा प्रयत्न केला तेव्हा आम्ही दुकाने बंद केली आणि आता जर हिंदी लादली गेली (पहिली ते पाचवीपर्यंत) तर आम्ही शाळा बंद करण्यास मागेपुढे पाहणार नाही
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी भाषा सक्तीची करण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी आहे, असे मनसे प्रमुख म्हणाले. ठाकरे यांनी आरोप केला की हिंदी लादून सरकार लोकांच्या प्रतिक्रियेची परीक्षा घेत आहे कारण त्यांना शेवटी मुंबईला गुजरातशी जोडायचे होते. ते म्हणाले की हिंदी फक्त '200 वर्षे जुनी' आहे तर मराठीचा इतिहास 2500-3000 वर्षांचा आहे.
Edited By - Priya Dixit