गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 30 डिसेंबर 2024 (13:25 IST)

तर अजित पवार 20 हजार मतांनी पराभूत झाले असते,शरद पवारांच्या पक्षाच्या आमदाराचा खळबळजनक दावा

MLA Uttam Jankar claims Ajit Pawar
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी महायुतीला भरघोस विजय मिळवल्यानन्तर विरोधी पक्ष ईव्हीएम मध्ये छेडछाड करून विजय मिळाला असल्याचे सांगत आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. या बाबत शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. 

जानकर यांनी 150 जागांवर अनियमितता करण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले जर निवडणूक निष्पक्षपणे पार पडली असती तर महायुतीला केवळ 107 जागा मिळाल्या असत्या. इतके नाही तर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा 20 हजार मतांनी पराभव झाला असता. 
निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिल्या नंतर देखील जानकर यांनी निवडणुकांच्या निकालावर प्रश्न उपस्थित केले आहे. महायुतीने फसवणूक करून हा विजय मिळवण्याचा दावा जानकर यांनी केला आहे. 
शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर म्हणाले की, मी प्रत्येक मतदारसंघाचा अभ्यास केला आहे. ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा आरोप करत त्यांनी अजित पवारांच्या बारामती मतदारसंघात अजित यांना एक तृतीयांश मते ईव्हीएम मशीनमध्ये मिळावीत, अशी व्यवस्था केल्याचा दावा केला आहे. 
Edited By - Priya Dixit