संबंधित माहिती
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर यशवंतपूर-बिकानेर एक्सप्रेसवर दरोडा, लाखो रुपयांची लूट
- सोलापूरमध्ये एकतर्फी प्रेमातुन संतप्त झालेल्या प्रियकराने प्रियसीच्या पतीची हत्या केली
- फादर्स डे निमित्त वडिलांसोबत एक निवांत आणि आध्यात्मिक प्रवास, भेट द्या महाराष्ट्रातील या तीर्थक्षेत्री
- Swami Samarth Story स्वामींच्या कानातून वाहू लागल्या रक्ताच्या धारा! स्वामींनी गणपतची परीक्षा का घेतली?
- अक्कलकोट तालुक्यात महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली
स्वामी समर्थांची लीला: जेव्हा भक्ताच्या झोळीतील हाडं झाले सोन्याचे!
गोपाळ नावाचा एक भक्त स्वामींची कीर्ती ऐकून अक्कलकोटला दर्शनास आला होता. स्वामींच्या सहवासात तो इतका रंगला कि तो अक्कलकोटलाच राहू लागला. चार वर्ष झाले तरी मुलगा येत नाही, म्हणून त्याचे बाबा व काका अक्कलकोट ला येतात. ते पहिले चोळप्पांना चीरमीरी देऊन, स्वामींनी गोपाळाला आपल्या बरोबर पाठवावं, असं करू पाहतात. पण काहीही झाल्या, गोपाळ परत यायला तयार नसतो.
मग त्याचे बाबा आणि काका त्याला स्वामी समोर समजवतात- "अरे तु कुणाच्या नादी लागला आहे?" "या बाबांच्या अंगावर, अंगभर कपडे सुद्धा नाही आहे! ते तुला काय देणार?" "अरे तु व्यापाऱ्याचा मुलगा आहे, इथे जे ४ वर्ष वाया घालवले, तेच व्यापाराला दिले असते तर किती तरी धन कमवले असते." स्वामी मंदस्मित करत निमूटपणे सर्व ऐकतात. मग स्वामी म्हणतात-" अरे गोपाळा! मुलांनी आपल्या वडीलधारी मंडळीचं ऐकावं, त्यांची आज्ञा पाळावी. तु आपल्या बाबा आणि काका बरोबर आपल्या गावी जा. गोपाळ पहिले तयार होत नाही पण स्वामी आज्ञा म्हणून होकार देतो.
जातांना स्वामी त्याला दोन भले-मोठे हाडं देतात. स्वामी म्हणतात-" अरे गोपाळा ! तुझे बाबा आणि काका बरोबर बोलतात, आमच्या कडे तुला द्यायला काहीही नाही, हेचं हाडं आमची आठवण म्हणून घेऊन जा." गोपाळ त्या हाडांना हृदयाला लावून काळजीनी नेतो. रस्ताभर त्याचे बाबा-आणि काका स्वामींची थट्टा करतात. गोपाळ निमुटपणे ऐकत राहतो.
घरी पोहचल्यावर बाबा म्हणतात- "अरे हाडं काय घरात ठेवणार ! " "फेंक घरा बाहेर!" गोपाळ हाड ठेवलेली पिशवी हृदयाला लावतो. त्याचे बाबा आणि काका बळ-जबरीनी पिशवी हिसकवतात. त्यामुळे ती पिशवी खाली पडते आणि त्यातले हाडं बाहेर पडतात. सर्वजण पाहतात तर काय हाडं सोन्याचे झाले होते. गोपाळच्या, बाबा आणि काकांना स्वामींच्या अधिकाराची प्रचीती येते. जन्मभर श्रम करुन सुद्धा इतकं सोनं जमवता आले नसते.
गोपाळ म्हणतो -"या सुवर्णात माझा काहीच रस नाही." "हे सोनं तुम्ही ठेवा ! मी स्वामी कडे परत जातो." "स्वामी कडे २-४ दिवस चालणारं धन नाही मिळत, पण जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सोडवणारी मुक्ती मिळते." "आपल्या जीवनाला गती मिळणे हाच मनुष्य जन्माचा परमोच्च हेतू आहे."
- श्रीपाद श्रीवल्लभ (दत्तगुरू) यांच्या लीलांमधील ही एक प्रसिद्ध कथा
