संबंधित माहिती
- आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही - चंद्रकांत पाटील
- अयोध्या : निकालापूर्वी शहरात असं आहे वातावरण - ग्राऊंड रिपोर्ट
- शिवसेना भाजप सत्तासंघर्ष : महाराष्ट्रासमोर 9 नोव्हेंबरनंतर असे आहेत पर्याय
- अभिताभ बच्चन : 50 वर्षांपूर्वी अशी झाली रुपेरी पडद्यावरील प्रवासाला सुरुवात
- ‘उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय सर्वांना मान्य’ शिवसेना आमदारांचा बैठकीत निर्णय
'माहा' चक्रीवादळाचा धोका टळला
अरबी समुद्रातील 'माहा' चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने गुजरातच्या किनारपट्टीवरचा संभाव्य धोका टळला आहे. दीवच्या किनारपट्टीपासून 90 किलोमीटर आणि वेरावळपासून 100 किलोमीटरवर हे चक्रीवादळ पोहोचले आहे.
'कयार' या चक्रीवादळापाठोपाठ आलेल्या 'माहा' या चक्रीवादळाने अतितीव्र स्वरूप धारण केले होते. हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता होती.
हवामान विभागाकडून गुजरातमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आल्यानं गुजरात सरकारकडून नागरिकांच्या स्थलांतरासाठीची तयारी करण्यात आली होती. तसेच राज्यातील आपत्ती निवारण यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली होती.
मात्र, या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागल्याने गुजरात राज्यात किनारपट्टीजवळ राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला.