श्री समर्थांच्या आरत्या
सौ. कमल जोशी
|
एक आरती करितां भक्तांचे वोळी।
तेणे सहस्त्र आरत्या केल्या वनमाळी।
बाळका पूजितां जेवि जननी तोषली।
रामी रामदासा भावे ओवाळी।।
ह्यातील भाव कोणता? तर देवात विरून जाण्यापेक्षा अणुमात्र द्वैत राखल्याने भक्ताला आनंद होतो, संत तुकोबा नाही का म्हणत? तरीच जन्मा यावे। दास विठ्ठलाचे व्हावे।
मायेचा स्वीकार करून अंतरात्माच गणेशाच्या रूपाने नटतो. तोच षड़गुणैश्वर्य संपन्न भगवान ईश्वर, हाच सर्व शिवगणांचा इंद्रियगणांचा स्वामी गणेश हा गणेश
ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस: श्रिय:।
ज्ञानवैराग्ययोश्चेति षण्णां भगशति स्मृति:।
ब्रह्माचे पाहिले सगुण रूप होय. ते निरनिराळ्या गुणांनी वेगळेपणानी जाणवते आणि आपल्या समजुतीनुसार आपण त्या रूपाला वेगळेपणाने पाहतो. आळवितो त्या रूपातील गुणाचे स्मरण करून त्यात रत होतो, त्यालाच आरती म्हणतात. समर्थांनी देवतेच्या बाह्य नामरूपाला आणि आत्मज्योतीला आर्त होऊन ओवाळले. श्रीकृष्णाच्या आरतीत हे म्हणतात.
हरिहर सुंदर ओघ एक्यासी आले।
प्रेमानंदे बांधे मिळणीं मिळाले।
एशिया संगमी मिसळोनी गेले।
रामदास त्यांची वंदी पाऊले।
परमार्थाचे ध्येच जीवब्रह्म-ऐक्य हे आहे तेच श्री समर्थांच्या सर्वच आरत्यांमध्ये पाहावयास सापडते.
जय जय रघुवीर समर्थ ।
