1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 30 एप्रिल 2014 (13:17 IST)

मोदी-सोनिांमध्ये ‘सेटिंग’

LoksabhaElection News
नरेंद्र मोदी रायबरेलीत सोनिया गांधींविरोधात प्रचाराला का येत नाहीत आणि काँग्रेस अध्यक्षा वाराणसीत आपल्या उमेदवाराचा प्रचार का करत नाहीत? या दोघांमध्ये आधीच काहीतरी सेटिंग झाले का? असा सडेतोड सवाल करत ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजप, काँग्रेसवर हल्ला चढवला आहे.

रॉबर्ट वद्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या भाजपने राजस्थानात सत्ता असताना त्यांच्याविरोधात एफआयआर का दाखल केला नाही, त्यांना अटक का केली नाही?, असे प्रश्नही केजरीवाल यांनी उपस्थित केलेत. भाजप आणि काँग्रेसचे नेते जनतेसमोर एकमेकांवर चिखलफेक करत असले तरी पडद्याआड त्यांची हातमिळवणी झाली आहे आणि ते एकमेकांना वाचवण्याचाच प्रयत्न करत आहेत, अशी चपराक केजरीवाल यांनी लगावली.

वाराणसी मतदारसंघात सोमवारी ‘आप’च्या कार्यकर्त्यांना मरहाण झाली. ही भाजप कार्यकर्त्यांचीच दादागिरी असल्याचा ‘आप’चा दावा आहे. त्यावरूनच अरविंद केजरीवाल यांनी आज भाजप आणि काँग्रेसचा समाचार घेतला. वाराणसीत भाजपची गुंडगिरी सुरू असून आपण त्याला घाबरत नसल्याची गर्जनाच त्यांनी केली. तसंच, भाजप आणि काँग्रेसमध्ये ‘सेटिंग’ झाल्याचा सणसणीत आरोपही केला.

केजरीवाल म्हणतात

* वाराणसीचे मतदार घाबरलेले असून मतदान केंद्रावरच्या सुरक्षेबाबत त्यांना भीती वाटतेय.

* आङ्क आदमी पक्ष गुंडगिरी आणि हल्ल्यांना घाबरत नाही. पण आम्हाला वाराणसीचा सांस्कृतिक वारसा जतन करायचा आहे.

* मी कुमार विश्वास यांच्यासाठी अमेठीत प्रचार करत आहे आणि करत राहणार आहे.

* अमेठीत राहुल गांधी यांचा पराभव झाल्यास तर काँग्रेसचे अस्तित्वच संपून जाईल.

* नरेंद्र मोदी वाराणसीत हरले तर भाजपची लाजच जाईल.

* स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासनासाठी जनतेने राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींचा पराभव करावा.

* रॉबर्ट वद्रा यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना अटक करणे भाजपला सहज शक्य होते. परंतु, त्यांनी त्यांच्यावर आरोप करण्याशिवाय काहीच केलेले नाही.

* गुजरात दंगलीवरून काँग्रेस मोदींना लक्ष्य करते, पण ठोस काहीच कारवाई करत नाही.

* भाजप आणि काँग्रेसमध्ये साटेलोटे आहे आणि ते जनतेला मूर्ख बनवायचा प्रयत्न करत आहेत.