1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. युद्धाचे ढग

भारत-पाक तणावाचा वाघा सीमेवर परिणाम

भारतपाक तणावाचा वाघा सीमेवर परिणाम
मुंबई हल्‍ल्‍यानंतर भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यात निर्माण झालेल्‍या तणावाचा परिणाम अटारी-वाघा या दोन्‍ही देशांच्‍या सीमेवरही पहायला मिळाला आहे. रोज सायंकाळी सीमेवर दोन्‍ही बाजूने सैनिक समोरा-समोर येऊन देशाचा ध्‍वज उतरवित असतात. यावेळी दोन्‍ही देशांच्‍या सैनिकांमध्‍ये चांगलाच जोश पाहिला जात असतो.

मात्र सध्‍या युद्धजन्‍य परिस्थिती निर्माण झाल्‍याने दोन्‍ही बाजूच्‍या जवानांमध्‍ये अधिक आक्रमकता दिसत आहे. युध्‍द स्थिती निर्माण झाल्‍याने दोन्‍ही बाजूच्‍या जवानांकडून जोरदार घोषणाबाजी केली केली जाते. अमृतसर येथून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्‍या अटारी-वाघा आंतरराष्‍ट्रीय सीमेवर 'रिट्रीट' समारंभाच्‍या वेळी दोन्‍ही बाजूच्‍या जवानांमध्‍ये आक्रमकता दिसत असली तरीही मुंबईवरील हल्‍ल्‍यानंतर त्‍यात वाढ झाली आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा