संबंधित माहिती
- मी तोंड उघडले तर कुटुंबातील काही लोकांना तोंड दाखवता येणार नाही, शरद पवारांच्या समर्थनावर अजितदादा संतापले
- वर्षा गायकवाड यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण
- ठाणे एसटी विभाग सज्ज, नियमित गाड्यांव्यतिरिक्त २५ गाड्यांचे नियोजन
- मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा,वाचा फेसबुकवर पोस्टमध्ये काय लिहिले
- राज ठाकरे म्हणाले मोदींनी देशाचे पंतप्रधान व्हावे हे सांगणारा मी पहिला माणूस होतो
लातूरमध्ये एसयूव्ही आणि ट्रकची भीषण टक्कर, एमपीच्या 4 कापड व्यापाऱ्यांचा मृत्यू
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात एका भीषण रस्ता अपघातात चार व्यावसायिकांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एसयूव्ही आणि वेगवान ट्रक यांच्यात धडक झाली. ज्यामध्ये मध्य प्रदेशात राहणाऱ्या चार कापड व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास निलंगा-उदगीर मार्गावर हा अपघात झाला. ट्रक निलंगाहून देवणीच्या दिशेने जात होता तर विरुद्ध दिशेने एसयूव्ही येत होती. टक्कर इतकी भीषण होती की एसयूव्हीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. त्यात प्रवास करणाऱ्या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, संजय जैन, राजीव जैन, सचिन उर्फ दीपक कुमार जैन आणि संतोष जैन अशी मृतांची नावे आहेत. प्रत्येकाचे वय 40 च्या आसपास आहे. ते मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी होते. पोलिसांनी अपघाताची माहिती कुटुंबीयांना दिली आहे.
मृत सर्व कापड व्यापारी असून ते कामानिमित्त लातूरला आले होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. या अपघाताप्रकरणी देवणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
