1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जुलै 2022 (10:34 IST)

तुमच्या WhatsAppवर कोणाचे 'लक्ष' आहेत का? जाणून घ्या

whats app
सोशल मीडियावर दररोज काहीतरी व्हायरल होत असते. यातील काही गोष्टी अगदी आश्चर्यकारकही आहेत. यासोबतच अनेक वेळा सोशल मीडियावर काही खोट्या गोष्टीही व्हायरल होतात, ज्यावर लोकांचा खूप विश्वासही असतो. त्याचवेळी सोशल मीडियावर एक मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे. तुमच्या व्हॉट्सअॅप आणि कॉलिंगवर भारत सरकारकडून नजर ठेवली जात असल्याचा दावा केला जात आहे.
 
मेसेजमध्ये या गोष्टी लिहिल्या आहेत
सोशल मीडियावर पसरत असलेल्या मेसेजमध्ये अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. त्यात असे लिहिले आहे की, 'व्हॉट्सअॅप आणि फोन कॉलसाठी नवीन संवाद नियम आजपासून लागू होतील. सर्व कॉल रेकॉर्ड केले जातील. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर आणि सर्व सोशल मीडियावर लक्ष ठेवले जाणार आहे. तुमची उपकरणे मंत्रालय प्रणालीशी जोडली जातील. कोणाला चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी घ्या. 
 
अटक होऊ शकते
याशिवाय या संदेशात असे लिहिले आहे की, 'सध्या कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक विषयावर लिहिणे किंवा संदेश पाठवणे गुन्हा आहे. असे केल्याने वॉरंटशिवाय अटक होऊ शकते. पोलीस अधिसूचना जारी करतील… मग सायबर क्राईम… मग कारवाई होईल. हे अत्यंत गंभीर आहे. चुकीचा संदेश जाणार नाही याची काळजी घ्या आणि सर्वांना सांगा आणि या विषयाकडे लक्ष द्या.
 
पीआयबीने सत्य सांगितले
मात्र, पीआयबी फॅक्ट चेकने हा मेसेज बनावट असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने असे कोणतेही नियम लागू केलेले नाहीत, असे पीआयबी फॅक्ट चेकमधून सांगण्यात आले आहे. हा दावा खोटा आहे. अशी कोणतीही खोटी/अस्पष्ट माहिती शेअर करू नका.