1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. झळा दुष्काळाचा
  6. हजार फुटांपर्यंतही पाणी लागेना

Maharashtra, Drought, Water, Relief Package, Sushilkumar Shinde | हजार फुटांपर्यंतही पाणी लागेना

WD
सलग दोन वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. ग्रामीण भागात हजार फुटांपर्यंत घेण्यात येणार्‍या विंधन विहिरींनाही पाणी लागत नसल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणच्या सुमारे 15 हजार हातपंपापैकी निम्म्याहून जास्त बंद पडले आहेत. पाण्याची पातळी किती खाली गेली असावी हे यावरून स्पष्ट होते. असे असताना शासनाने मात्र पिण्याच्या पाण्यासाठी फक्त दोनशे फुटच खोल जाण्याचा दंडक घातला आहे. जिल्ह्यात 14 हजार 469 हातपंत आहेत. हातपंपाची संख्या जास्त दिसून येत असली तरी यातील 50 टक्के हातपंपांना पाणीच नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा