बुधवार, 4 फेब्रुवारी 2026
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified: बुधवार, 4 फेब्रुवारी 2026 (14:58 IST)

विनाशातून सृजनाकडे: महाशिवरात्रीचा खरा अर्थ काय?

Mahashivratri 2026
महाशिवरात्री हा फक्त एक सण नाही, तर तो आध्यात्मिक परिवर्तनाचा आणि जीवनाच्या गहन सत्याचा प्रतीक आहे. भगवान शिव हे त्रिमूर्ती (ब्रह्मा-विष्णू-महेश) मधील संहारक  म्हणून ओळखले जातात, पण त्यांचा संहार हा नकारात्मक किंवा अंधकारपूर्ण नसतो. तो रचनात्मक संहार आहे म्हणजे जुन्या, अप्रयोज्य, अज्ञान, अहंकार आणि नकारात्मकतेचा नाश करून नवीन सृजनाला मार्ग मोकळा करणे. अनेकदा आपण 'विनाश' किंवा 'संहार' या शब्दांना नकारात्मक मानतो. पण महादेवाच्या संदर्भात, विनाश हा नवनिर्माणाचा पाया असतो.
 
महाशिवरात्रीचा खरा अर्थ काय?
विनाश हे सृजनाचा पाया आहे. जसे झाडाची जुनी पाने गळून पडली तरच नवीन कोंब फुटतो, तसेच जीवनात जुने संस्कार, नकारात्मक विचार, अहंकार आणि विकार नष्ट झाले तरच शुद्ध चेतना आणि नवीन सुरुवात शक्य होते.
 
१. जुनं संपल्याशिवाय नवीन घडत नाही
जसा एखादा जुना, जीर्ण झालेला वाडा पाडल्याशिवाय तिथे आलिशान इमारत उभी राहू शकत नाही, तसेच आपल्या मनातील वाईट विचार, अहंकार आणि जुन्या सवयींचा विनाश झाल्याशिवाय 'सृजन' म्हणजेच नवीन विचारांचा जन्म होऊ शकत नाही.
 
२. तांडव: ऊर्जेचे चक्र
नटराज रूपातील शिव जेव्हा तांडव करतात, तेव्हा तो जगाचा अंत नसून तो एका नव्या युगाची नांदी असते. आपल्या आयुष्यात येणारी संकटे ही खरं तर आपल्याला नवीन आकार देण्यासाठी आलेली 'तांडवे' असतात.
 
३. अंधाराकडून प्रकाशाकडे
शिवरात्री म्हणजे वर्षातील सर्वात गडद रात्र. पण याच रात्री आपण जागर करून त्या अंधारावर विजय मिळवतो. आपल्या आत असलेल्या अज्ञानाचा (विनाश) करून ज्ञानाचा (सृजन) उदय करणे, हाच या रात्रीचा मुख्य उद्देश आहे.
 
४. त्याग आणि प्राप्ती
महादेवाने हलाहल विष पचवले (विनाश पचवला) तेव्हाच अमृत आणि शांतता सृष्टीला मिळाली. आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेचा स्वीकार करून तिचे रूपांतर सकारात्मकतेत करणे, हीच खरी शिवभक्ती!
 
आध्यात्मिक संदेश (दार्शनिक अर्थ)
अहंकाराचा नाश- महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करणे म्हणजे मनातील अंधार (अज्ञान, विकार) नष्ट करणे आणि शिवतत्त्व (शुद्ध चेतना) जागृत करणे.
अंधाराचा उत्सव- सर्वांत अंधकारमय रात्र असते तरी ती जागृतीची रात्र आहे. "महाशिवरात्री म्हणजे अंधाराचा उत्सव नाही, तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची संधी आहे."
परिवर्तनाची प्रक्रिया- जीवनात दुःख, अपयश, नुकसान हे "विनाश" वाटतात, पण ते नवीन सुरुवातीचे द्वार असतात. शिव हे शिकवतात की स्वीकार करा, सोडा आणि नव्याने जन्म घ्या.
 
काय करावे?
उपवास आणि जागरण केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते.
ध्यान आणि भजन करुन जसे "ॐ नमः शिवाय" चा जप करून आंतरिक शांतता मिळते.
स्वतःचा अहंकार सोडणे गरजेचे आहे. जुन्या सवयी, राग, मत्सर सोडून नवीन दृष्टी स्वीकारावे.
 
महाशिवरात्री सांगते की विनाशाशिवाय सृजन नाही, आणि सृजनाशिवाय जीवन नाही. ही रात्र आपल्याला शिकवते की प्रत्येक अंत हा नवीन सुरुवातीचा प्रारंभ आहे. शिवाच्या कृपेने आपले जीवनही विनाशातून सृजनाकडे जाऊ दे! महाशिवरात्री आपल्याला शिकवते की, आयुष्यात काही गोष्टी संपणे (विनाश) हे काहीतरी अधिक भव्य आणि दिव्य सुरू होण्यासाठी (सृजन) अत्यंत आवश्यक असते.