कृषी उत्पन्न बाजार समिती १४ नोव्हेंबर पर्यंत बंद
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे पडसाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती दैनंदिन व्यवहारवर देखील उमटले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती पांचशे-एक हजार रूपयांच्या नोटा बंद झाल्याने व्यवहार करणे कठीण झाले असल्याने गुरुवारपासून लासलगांव, मनमाड, पिंपळगाव, नांदगांव या कृषी उत्पन्न बाजार समिती १४ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहे.