Air India executive pilots call off strike | एअर इंडियाचा संप मिटला
नागरिक उड्डयण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मागण्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर एअर इंडियाच्या वैमानिकांनी आपला संप मागे घेण्याची घोषणा केली आहे.
मागील पाच दिवसांपासून कर्मचारी संपावर गेल्याने कंपनीचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. पटेल यांनी आज वैमानिकांनी कामावर परतावे अन्यथा सरकारला कठोर कारवाई करावी लागेल असा इशारा दिला होता.
आज अखेर वैमानिकांनी आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने वैमानिकांनी त्यांचे आभारही मानले आहेत.
मागील पाच दिवसांपासून कर्मचारी संपावर गेल्याने कंपनीचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. पटेल यांनी आज वैमानिकांनी कामावर परतावे अन्यथा सरकारला कठोर कारवाई करावी लागेल असा इशारा दिला होता.
आज अखेर वैमानिकांनी आपला संप मागे घेत असल्याची घोषणा केली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने वैमानिकांनी त्यांचे आभारही मानले आहेत.
