- वृत्त-जगत
» - अर्थजगत
» - वाणिज्य वृत्त
तांदूळ आणखी महागणार ?
मान्सून संपण्यास आता केवळ एका आठवड्याचा कालावधी उरला आहे. खरीप पाठोपाठ रबीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, तांदुळाचे उत्पादन विक्रमी घसरल्याने आता साखरे पाठोपाठ आगामी काळात आपल्याला तांदुळही महाग मिळणार आहे. चालू वर्षात तांदळाचे उत्पादन 10 लाख टनने घसरण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांना वाटत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनीही तांदूळ महाग होण्याची शक्यता वर्तवली आहे. देशातील अनेक राज्यांतील जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तांदळासाठी लागणारा पाऊस अनेक भागात फिरकलाही नसल्याने अनेक भागातील तांदळाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे. डाळ साखरे पाठोपाठ आता तांदूळही महाग होणार असल्याने सामान्यांनी काय खावे असा प्रश्न पडला आहे.