1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

आजपासून दुसरी कसोटी!

आजपासून वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी क्रिकेट सामना केन्सींग्टन ओव्हल मैदानावर सुरू होत आहे. पहिल्या कसोटीतील पराभवामुळे विंडीजचे मनोधैर्य खचले आहे. दुसरीकडे वन-डे मालिकेतील विजयानंतर कसोटीतही आघाडी घेतल्यामुळे "टीम इंडिया'चे मनोधैर्य वाढलेले आहे. ही कसोटी जिंकून तीन लढतींच्या मालिकेतील विजय निश्‍चित करण्याचा भारताचा प्रयत्न राहणार आहे.

भारताला 1971 पासून येथे सलग पाच कसोटींत पराभव पत्करावा लागला आहे. मुळात 1953 मध्ये येथे प्रथम खेळल्यापासून भारताला 58 वर्षांत एकदाही कसोटी विजय मिळला नाही. भारताला एकूण सात पराभव आणि एकच कसोटी अनिर्णित असे अपयश येथे पत्करावे लागले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा