Last Modified: बंगळूर , शनिवार, 8 जानेवारी 2011 (12:22 IST)
आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव!
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर ८ दिवसांनी सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौथ्या सत्रासाठी शनिवारपासून खेळाडूंचा लिलाव सुरू होत आहे. हा लिलाव २ दिवस चालेल. ३ वर्षांच्या कारकिर्दीत नेहमीच वादात अडकणारी आयपीएल पुन्हा वादात सापडली आहे. स्थानिक खेळाडूंना करारबद्ध करण्याच्या मुद्द्यावरून ५ फ्रँचायझी आयोजकांवर नाराज आहेत.
नवीन नियमानुसार, आयपीएल-३मध्ये आपापल्या संघांकडून किमान ७५ टक्के सामने खेळलेल्या भारतीय खेळाडूंनाच लिलावासाठी तयार करण्यात आलेल्या अंतिम यादीत स्थान मिळाले. हा नवा नियम केवळ श्रीमंत फ्रँचायझी संघांसाठीच फायद्याचा असल्याचा आरोप असंतुष्ट संघांनी केला आहे.