श्रावणातलं सुरेल गीत
| |
|
अशी सूरपरंपरा असताना सावनी व बेलाला त्याची लागण झाली नसती तरच नवल. सावनी हे नावही अर्थपूर्ण आहे. श्रावणात गायलं जाणारं गीत म्हणजे सावनी. सूरांइतकच सावनीचं व्यक्तिमत्वही तितकंच सुंदर आहे. तिच्या सूरांत ऐकणाऱ्यालाही खेचून घेण्याचं सामर्थ्य आहे.
|
एकीकडे सावनी शास्त्रीय संगीतात रमत असताना बेला मात्र सुगम संगीतातून स्वतःची ओळख निर्माण करू पाहत होती. टिव्हीएस सारेगामाची मेगा फायनल जिंकलेली बेला लोकप्रियतेच्या एकेक पायऱ्या पुढे जात असताना सावनी मात्र शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे. तिच्या रियाझातून गायनातून तिची स्वतंत्र विचारसरणी कळून येते. आलाप, ताना, मींड व पलटी सादर करताना तिच्या आवाजातील परिपक्वताही कळून येते. सुगम संगीताऐवजी शास्त्रीय संगीत हेच करीयर म्हणून निवडणाऱ्या सावनीचे विचार अतिशय स्पष्ट आहेत. संगीतात शॉर्टकट नसतो, असे तिचे मत आहे. पैसा ही आज गरज आहे, पण ती एवढीही नाही, की त्यासाठी काहीही केले पाहिजे, असे ती म्हणते. त्यामुळे जास्तीत जास्त चांगलं गायचं हा तिचा उद्देश आहे.
