मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : गुरूवार, 16 मार्च 2023 (08:43 IST)

Rahu Ketu Dosh Upay राहू-केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी खास आहे हा उपाय

rahu ketu
ज्योतिष शास्त्रात राहू-केतूला सावली ग्रह मानले जाते. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहु आणि केतूचा दोष असतो, त्याचे जीवन नरकासारखे होते. म्हणजेच अशा लोकांवर नेहमी राहू-केतूची सावली असते. अशा परिस्थितीत माणूस जे काही काम करतो, त्यात यश मिळण्याची शक्यता फारच कमी असते. यामुळेच राहू-केतूच्या अशुभ प्रभावाने लोक घाबरतात. जरी अनेक वेळा कुंडलीतील राहू-केतू देखील शुभ प्रभाव देतात, परंतु बहुतेकांचा असा विश्वास आहे की राहू-केतू दशा खूप वेदनादायक असते. अशा परिस्थितीत राहू-केतूच्या दशा आणि महादशा निवारणासाठी राहू केतूसाठी कोणता ज्योतिषीय उपाय योग्य ठरेल हे जाणून घेणे आवश्यक आहे. राहू-केतूच्या शांतीसाठी ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही प्रभावी उपाय जाणून घेऊया.
 
राहु - केतु उपाय Rahu Ketu Remedy
- ज्योतिषशास्त्रानुसार दुर्गा देवीची पूजा केल्याने राहू-केतूचे दोष दूर होतात. दुर्गा सप्तशतीमध्ये दुर्गाला छाया अस्तित्व म्हटले गेले आहे आणि राहू-केतू हे देखील छाया ग्रह आहेत. अशात दुर्गेची पूजा केल्याने राहू-केतूच्या अशुभ प्रभावांपासून वाचता येतं.
 
- ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये शेषनागावर नृत्य करणाऱ्या श्रीकृष्णाचे चित्र ठेवावा आणि नियमित पूजा करावी. पूजेदरम्यान 'ओम नमो भगवते वासुदेवाय नमः' या मंत्राचा १०८ वेळा जप करा. राहू-केतूच्या शांतीसाठीही हा उपाय प्रभावी ठरतो, असे मानले जाते.
 
- ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते राहु केतू बीज मंत्रांचा जप केल्याने दोषही दूर होतात. अशा स्थितीत ज्या लोकांच्या कुंडलीत राहू-केतूचे दोष आहेत, त्यांनी त्यांच्या बीज मंत्रांचा जप करावा. राहु बीज मंत्र – ॐ रां राहवे नमः व केतु बीज मंत्र - ॐ स्रां स्रीं स्रौं सः केतवे नमः
 
- धार्मिक मान्यतांनुसार, गरीब मुलीचे लग्न लावून देऊन किंवा तिच्या लग्नात मदत केल्यानेही राहु-केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो. असे केल्याने राहू-केतूचा अशुभ प्रभाव हळूहळू संपतो असे मानले जाते.
 
- ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी मुलींना दही आणि खीर खाऊ घातल्याने केतूचे दोष दूर होतात. त्यामुळे जीवनातील समस्या संपतात आणि वाईट दिवस संपतात.
 
मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत केतू अशुभ असेल तर संबंधित व्यक्तीने नेहमी हिरवा रुमाल सोबत ठेवावा. हिरव्या रंगाचा रुमाल धारण केल्याने केतूचे वाईट शांत होते असे म्हणतात.
 
- रत्न शास्त्रामध्ये राहू पाषाण दोष शांत करण्यासाठी गोमेद दगड धारण करण्याचा सल्ला दिला आहे. ज्योतिषीही ते योग्य मानतात. अशा स्थितीत राहुच्या शांतीसाठी हा दगड शनिवारी एखाद्या चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घेऊन धारण करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने राहू दोष दूर होतो.
 
Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही.